ऐतिहासिक हर्सूल तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली.त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या सहकार्यासोबत नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने सोमवारी सकाळी ९:३० वाजता जलपूजन केले. आ. दानवे यांच्या सोबत जलपूजेला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख संजय हरणे, सुरेश फसाटे,बन्सी जाधव, प्रतिभा जगताप, मीना फसाटे आदिंची उपस्थिती होती.
