औरंगाबाद : मराठा समाजावर अन्याय होत आहे.
समाजाच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे आज दि.९ ऑगस्ट रोजी जागरण-गोंधळ आंदोलन क्रांती चौक येथे सुरू केले आहे.
कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा द्या, मराठा आरक्षण आंदोलनातील शहीद झालेल्या बांधवांच्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत करा,अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला गती द्या. यासह अन्य मागण्या महाराष्ट्र शासनाने पूर्ण करावे असे मराठा क्रांती ठोक मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले.
